गावाविषयी माहिती
मंदाग्नी पर्वताच्या पायथ्याशी वसलेले देवघर हे गाव महाराष्ट्र राज्यातील पालघर जिल्हयातील वाडा तालुक्यात वारकरी पंरपरा लाभलेले हे गाव आहे. गावात विठ्ठल रुखमाई मंदीर असून गावाची वारकरी परंपरा आणि संस्कृती जोपासणारे हे केंद्रबिंदूस्थान आहे. त्याच प्रमाणे गावातील पाडयांमध्ये विविध मंदिरे असून गावक-यांचे श्रध्दास्थान आहे. एक गाव एक गणपती अशी गावाची 100 वर्षाची परंपरा आहे. गावात सर्व जाती धर्माचे लोक गुण्यागोविंदाने राहतात. सन 2011 च्या जनगणनेनुसार गावाची लोकसंख्या 1120 आहे.
गावात जिल्हा परिषद शाळा, हायस्कुल, डी एड कॉलेज, लॉ कॉलेज आहे. गावात सार्वजनिक विहीरी, पाणी पुरवठा नळ योजना अशा प्रकारे पिण्याच्या पाण्याची सुविधा आहे. शैक्षणिक व धार्मिक, सामाजिक वसा या गावास लाभला आहे. गावाचा मुख्य व्यवसाय शेती असून टॉमॅटो, मिरची, फुल शेती अशी पिके घेतली जात असून मुख्य पिक हे भात आहे. या पिकांमधून शेतक-यांना चांगल्या प्रकारे उत्पन्न मिळते. या बरोबरच कुकुटपालन देखील गावात मोठया प्रमाणात होत आहे. त्यातुन चांगले उत्पन्न शेतक-यांस मिळत आहे. तसेच देवघर गाव हे आदिवासी (पेसा) क्षेत्रात येत असल्याने येथे आदिवासी संस्कृतीचे जन केले जाते. तसेच रुढी व परंपरेची जोपासना होते.